जळगाव(वार्ताहर) दि,३
सर्वसामान्य जनतेचे सरकार म्हणून ना.एकनाथ शिंदे यांनी आपल्या विविध लोकाभिमुख निर्णयातून आपल्या कामाची चुणूक राज्याला दाखवली आहे. तसेच आता ना. एकनाथ शिंदे सरकारने दलित, वंचित बहुजन व सर्वसामान्य वर्गाचे सातत्याने प्रश्न मांडणाऱ्या व पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेन्द्र कवाडे यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी देऊन आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करून राज्यात शिवशक्ती -भीमशक्तीचा नारा बुलंद करावा अशी आग्रही मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संपर्क प्रमुख, प्रदेश नेते राजुभाई मोरे यांनी मागणी केली आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ऐतिहासिक स्वरुपाची युती झालेली आहे. दोन्ही पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी,शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या, कष्टकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, मागासवर्गीयांच्या, शोषीत-पिढीत-वंचित इतर सर्व समाजातील सर्व घटकांसाठी न्याय देणारे शिंदे सरकार असल्यामुळे तसेच त्यांचा धाडसी स्वभाव, धाडसी निर्णय आणि सर्वांना न्याय देण्याची भूमिका पाहता पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी महायुती केलेली आहे. दोघांच्या महायुतीमुळे महाराष्ट्रसह देशात शिवशक्ती आणि भिमशक्ती खऱ्या अर्थाने मजबूत होणार आहे.
ना.एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेन्द्र कावडे हे दोन्ही नेते चळवळीतून अनेक आंदोलनातुन घडलेले, सक्षम नेते आहेत. सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी झटणारे, लढणारे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला, सर्व समाजाला परिचित आहेत. प्रा. जोगेन्द्र कवाडे चळवळीचा प्रदीर्घ अनुभव चळवळी साठीचा त्याग संघटना आणि आंबेडकरी जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देणारा नेता अशी त्यांची आंबेडकरी जनतेला ओळख असल्याने शिंदे सरकारच्या आगामी मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पद देऊन खऱ्या अर्थाने आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी राजूभाई मोरे यांनी केली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ-वायर लूम तुटल्याने चार रेल्वे ट्रॅकमन जखमी.