- यंदाचा दिवाळी सण रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंददायी ठरणार आहे. कारण ही दिवाळी तरुणांना रोजगार देणारी ठरणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून देशभरात सुमारे ७५ हजार तरुणांना रोजगाराची दिवाळी ‘भेट’ असणार आहे. ७५ हजार तरुणांना विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
येथे मििळेल नोकरी –संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, सीआयएसएफ, सीबीआय, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सरकारच्या विविध ३८ मंत्रालये आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमधील पदांची भरती करण्यात येणार आहे. जसे संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक असे विविध प्रकारच्या पदांची भरती केली जाणार आहे.
भरती प्रक्रीया कोणत्या संस्थांमार्फत होणार ?
जूनमध्ये मोदींनी सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये मनुष्यबळ आणि उपलब्ध नोकऱ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत भरती केली जाणार आहे. ही भरती थेट मंत्रालयांद्वारे किंवा UPSC बोर्ड, AAC, रेल्वे भर्ती बोर्ड इत्यादी संस्थांद्वारे केली जाणार आहे.