जळगाव : बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचालित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे २ व ३ एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये राज्यातील साहित्यिकांचा सहभाग राहणार असून विविध परिसंवाद, कवीसंमेलन, गझलसंध्या असे कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात सोमवार, १३ रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात येऊन माहिती देण्यात आली. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, राज्य समिती समन्वयक मुकुंद सपकाळे, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे उपाध्यक्ष
सुनील पवार, सहसचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, साहित्यिक जयसिंग वाघ आदी उपस्थित होते.
■ जळगावात हे संमेलन सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात होणार असून साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. भरत शिरसाठ राहणार आहेत.
■ २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संविधान सन्मान रॅली काढण्यात येऊन साहित्य संमेलन स्थळी विसर्जित होणार आहे व सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे.
■ दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी धम्मजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. सदर संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅली काढण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून साहित्यिक जयसिंग वाघ हे त्याचे अध्यक्ष आहेत.
■ या सोबतच विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. साहित्य नगरीला बबन कांबळे साहित्य नागरी नाव देण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वाराला प्रतापसिंग बोदडे प्रवेशद्वार नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशभरासाठी पुन्हा धोक्याची घंटा; कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली