महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हटविण्यासाठी संबंधीत आदेश पारीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, डि. एस. पी. सह, पोलीस अधिकारी, संबंधीत कर्मचारी त्वरीत बडतर्फ करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. जळगांव शहरातील तत्कालीन बौध्द वसाहत येथे कालकथित दलित झुंजार आक्रमक नेते राजारामजी गाढे हे अहमदाबाद येथील नोकरी सोडून जळगांव येथे राहण्यासाठी आले आणि त्यांनी त्याकाळी भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला होता. ती जरी खाजगी जागा होती परंतु सदरील पुतळ्याबद्दल कोणाचीही काही एक तक्रार नव्हती. तत्कालीन बौध्द वसाहत हे त्याकाळी आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू मानले जायचे. सामाजिक अन्याय, अत्याचार असो बौध्दांवर अत्याचार असो त्याविरोधात आंदोलनाची सुरुवात बौध्द वसाहत येथून कालकथित राजारामजी गाढे यांचे नेतृत्व असे त्यांचे पडसाद जिल्हाभरात उमटत असत. जळगांव जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आशेने बौध्द वसाहतीकडे पाहिले जायचे. आदरणिय कालकथित राजारामजी गाढे साहेब यांनी सदरिल पुतळा स्थापन केलेला होता. त्या पुतळ्या संदर्भात उठविण्याची कारवाई पोलिस प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली ही कारवाई केली गेली याचा आजच्या बैठकित जळजळीत निषेध करण्यात आला. जळगांव जिल्ह्याचे डि.एस.पी., जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक, संबंधीत पोलीस कर्मचारी आणि पुतळाहटविण्या संदर्भात तक्रार करणारे तक्रारदार आणि जागामालक व संबंधीत आदेश पारित करणारे अधिकारी यांच्यावर त्वरीत अट्रोसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यांना त्वरीत जेलमध्ये टाकावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे संपर्क प्रमुख प्रदेश नेते राजुभाई मोरे यांनी केली आहे.
पोलीसांनी केलेली कारवाई ही अत्यंत चुकीची असंवेदनशिल आणि निंदनिय असून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येवुन त्यांना त्वरीत बडतर्फ करण्यात यावे अन्यथा पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि तमाम आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करील तसेच या कारवाई संदर्भात आणि जळगांव शहराची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जळगांव शहराचे आमदार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शहराची शांतता राखण्याची विनंती केली. माननिय आमदार महोदयांचे आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि विविध संघटनेतर्फे अभिनंदन मोबाईल वरुन करण्यात आले. शनिवारी राजुमामा जळगांव शहरात येणार असून अत्यंत महत्वपूर्ण बैठक घेणार असल्याचे राजुभाई मोरे यांना सांगितले. तसेच या प्रकरणाची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेसर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांनीही गंभिर दखल घेतली असुन संबंधीतांवर कठोर कारवाईसाठी जळगांव भेटीवर येणार असल्याचे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संपर्क प्रमुख, प्रदेश नेते राजुभाई मोरे यांनी कळविले आहे. प्रा. जोगेंद्र कवाडेसर यांचे बौध्द वसाहतीशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्यावेळी अनेकदा तत्कालिन बौध्द वसाहतीत मुक्काम केलेला आहे. आजच्या तातडीच्या बैठकिला राजुभाई मोरे यांचे सह महानगर अध्यक्ष नारायण सपकाळे, महानगर जिल्हा अध्यक्ष – कल्पेश मोरे, सिध्दांत मोरे, बाबुराव वाघ, मिलींद सोनवणे पुतळा हटविण्याच्या संदर्भाच्या वेळीचे प्रत्यक्षदर्शी आणि पुतळा ज्यांच्या प्रयत्नातुन पुर्ववत बसविण्यात आला ते भिमयोध्दा चंद्रमणि तायडे, सतिष गायकवाड, प्रकाश पारधे, गोविंदआप्पा सोनवणे, फिरोज शहा व प्रत्यक्ष दर्शि इ. कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रमणी तायडे, भिका व्याह्याळे, सतिष गायकवाड, गोपाल डोंगरे इ. प्रत्यक्षदर्शी पुतळा वाचवण्यासाठीची महत्वाची भूमिका बजावणारे यांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि उपस्थित कार्यकर्त्यांचा (भिमयोध्दा) यांचा सत्कार पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे संपर्क प्रमुख प्रदेश नेते राजुभाई मोरे, बाबुराव वाघ, सुमनताई मोरे ,कल्पेश मोरे, संपूर्ण मोरे कुटुंब वतीने करण्यात आला
अखेर महामार्ग दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी २० लाखांचा निधी; वाहनधारकांत समाधान