जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत राज्यातून मोसमी पाऊस परतणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागील चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने चांगलेच धुमाकूळ घातले होते. दरम्यान, परतीच्या पावसानेही महाराष्ट्रतील विविध भागात पाऊस सुरू होता. परतीचा प्रवास थांबणार, अशी माहिती हवामान विभागाने यापूर्वी दिली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून राज्यात थंडीच्या चाहूलला सुरुवात झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचे प्रतीक देण्यात आले आहेत. अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली, त्यामुळे मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात 28 ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.