पाचोरा प्रतिनिधी: भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, विज्ञान तंत्रज्ञान, व कला, क्रीडा आशा विविध क्षेत्रात भारताने यशाची अनेक शिखरे सर केलेली आहेत.
भारतात रामायण-महाभारत काळापासूनच क्रीडा क्षेत्राला वेगळे महत्त्व आहे, अनेक खेळांची जननी सुद्धा भारत आहे, जगामध्ये खेळीमेळीच्या वातावरण जागतिक विकास साधता यावा व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून इ.स. १८९६ सालापासुन जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात झाली, पारतंत्र्य काळापासूनच भरतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी होत अनेक पदके पटकावली आहेत. देशातून असे खेळाडू घडत राहावे व देशाला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून देत राहावे यासाठी भारतीय खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी भारतात हॉकीची जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन म्हणून क्रीडा दिन देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो.
देश-विदेश होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खेळाडू ही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात, देशाला अनेक पदके मिळवून देत असतात, राज्यात शासनाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ही विविध ठिकाणी करण्यात येते, या खेळाडूंना शालेय जीवनापासूनच उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी मात्र अनेक शाळांमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून क्रीडा शिक्षकच नसल्यासचे उघड झाले आहे, त्यामुळे गाव पातळीवरील खेळाडूंना विविध स्तरावरील आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असून ही योग्य त्या मार्गदर्शका अभावी सहभागी होता येत नाही, असे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रात ही शालेय विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य असे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर हे देशाला विविध क्रीडा स्पर्धेत नक्कीच नावलौकिक मिळवून देतील. त्यामुळे महाविद्यालया प्रमाणेच प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य करणे गरजेचे आहे.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे पण अजून पर्यंत सरकारी शाळेमध्ये क्रीडा शिक्षक हे पद शासन भरत नाही आणि शासन भारताला ऑलम्पिक मध्ये मेडल घेण्याची अपेक्षा करत आहेत, यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी गुण असून ही उच्च दर्जाचे खेळाडू तयार होताना अडथळे निर्माण होत आहेत.
29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस म्हणून क्रीडादिन साजरा होत असताना पहिल्या ऑलम्पिक संघाचे नेतृत्व हे जयपालसिंग मुंडा या आदिवासी असणाऱ्या हॉकी पट्टूनी केले होते हे विसरून चालणार नाही. त्याच आदिवासी असणाऱ्या अनेक खेळाडूनां मात्र क्रीडाक्षेत्रापासून वंचित ठेवले जात आहे. एकीकडे जागतिक एथल्याटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा व धावपटू चौधरी हिने व अनेक भारतीय खेळाडू होणाऱ्या ऑलम्पिक क्रीडास्पर्धे मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे. पण यामध्ये आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी कुठेच दिसत नाही याचे मूळ कारण आहे आदिवासी विकास विभागात असलेली उदासीनता.. ज्याच्याकडे मुळातच नैसर्गिक खेळाडूवृत्ती, जिद्द, काटक, चिकाटी असे गुण असणाऱ्या या विध्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाशिक्षकांना नियुक्ती आदेशापासून वंचित ठेवले जात आहे हे अन्यायकारक नाही का?
एका बाजूला असे म्हटले जाते की आदिवासी विद्यार्थी हा राष्ट्रीय व ऑलम्पिक खेळाडू घडवा… निदान तशी अपेक्षा क्रीडाशिक्षकांकडून केली जाते पण आज शाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहे. कारण काय तर धोरणात्मक निर्णय म्हणून… आज DSO (जिल्हा क्रीडा संचलनालय ) क्रीडास्पर्धा सुरु झाल्या आहेत पण बरेच आदिवासी विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित आहेत याला जबाबदार कोण आहे? या सर्व गोष्टीला कुठेतरी प्रशासकीय धोरण कारणीभूत आहे पण आदिवासी पालक व आदिवासी संघटना यांनीदेखील जाणीवपूर्वक या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
हे देखील वाचा …
माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( इयत्ता १० वी व इयत्ता १२) वर्गासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी बोर्डाच्या संभाव्य तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून दि ३ सप्टेंबर रविवार रोजी पत्रकारांना मोफत रेणकोट,छत्री ,वाषीॅक विमा
आ.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते पाचोऱ्यात रविवारी ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन; शहर विकासात पडणार भर