पाचोरा (वार्ताहर) दि,३. खान्देश हितसंग्राम नाशिक आयोजित राज्यस्तरीय अहिराणी युवा कवी संमेलन रविवारी (ता. ८) होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भडगाव तालुक्यातील गिरड येथील अहिराणी कवी प्रा. रमेश धनगर गिरड यांची निवड झाली आहे. धनगर हे विविध पुरस्कारांनी सन्मानित असून मिळालेली जबाबदारी आपण समर्थपणे पेलणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी युवा कवी गणेश पाटील हे राहणार असून संमेलनाचे उद्घाटन अहिराणी बोलीभाषेतील सुप्रसिद्ध लेखक ज्ञानेश्वर भामरे, नाशिक यांच्या हस्ते होणार आहे. तर निमंत्रितांच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गझलकार शरद धनगर हे असतील. संमेलनास ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार, खान्देश मराठा मंडळ नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, अर्पण सेवा फाउंडेशन वापीचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, खान्देश हित संग्रामाचे अध्यक्ष भय्यासाहेब पाटील, डॉ. एस. के. पाटील, सुरेश पाटील, समाधान सोनवणे, कैलास पाटील, गणेश पाटील, शशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनात उद्घाटन, कवी संमेलन, पुरस्कार वितरण असा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन खान्देश हित संग्रामच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुनिता पाटील, शिवाजी ठाकरे, विकास पाटील, चेतन पाटील, प्रवीण पवार, तेजश्री पाटील, भक्ती पाटील व संयोजन समितीने केले आहे. प्रा. तुषार पाटील (निंभोरा), अमोल पाटील (औरंगाबाद), शामल पाटील (धुळे), गायक भय्या मोरे (नाशिक), कॉमेडियन विलास शिरसाट (कल्याण), अक्षय पाटील (दाभाडी) यांनी केले आहे.