सौर उर्जेसाठी शेती भाड्याने द्या,
अन् 30 हजार रुपये कमवा!
अल्पभूधारक, नापीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना
शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करता यावा यासाठी
राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी ही योजना सुरू केली असून, ही योजना राज्यात २०१७ पासून सुरू
आहे. महावितरणकडून ही योजना राबविली
जात आहे. या योजनेसाठी जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरणकडून एकरी ३० हजार
रुपये वर्षाला मिळणार आहेत. यामुळे
ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक अल्पभूधारक जमीन असलेले शेतकरी आहेत. तसेच अनेकांकडे जमीनदेखील पडत असते, अशा शेतकऱ्यांना
शेतीमधून फारसे उत्पन्न येत नाही.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना..
काय आहेत निकष..
११ केव्ही ते १३२ केव्ही वीज उपकेंद्राच्या ५ ते १० कि.मी परिसरात या योजनेचे कार्य सुरू केले जाते. ही जमीन महावितरण केंद्रापासून जमीन ५ कि. मी अंतरावर असणे आवश्यक आहे. किमान तीन ते पाच
एकर पर्यंत जमीन भाड्याने घेतली जाऊ शकते. कृषी सौर वाहिनी योजनेचा लाभ घेतला तर पडीत असलेल्या
जमिनीतूनदेखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे. पारंपारिक ऊर्जेची बचत व्हावी व अतिरिक्त वीज भाड्याने शेत जमीन वर्षाला भाड्यापोटी ३० हजार रुपये मिळतात.
खरेदी करण्याचा खर्च वाचवा यासाठी मुख्यमंत्री कृषी दिल्यानंतर एका एकराला सौर वाहिनी योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना राळेगणसिद्धी व कोळंबी येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ही योजना राबवली होती. त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षापासून जळगाव जिल्ह्यातदेखील राबविण्यात येत आहे.त्यानंतर प्रत्येक वर्षात ५
टक्के वाढीव मोबदला देण्यात येत असतो.
एकरी ३० हजार रुपये.. याबाबत महावितरणकडे
पाठपुरावा करून, शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोच, मात्र
लाभ कसा घेणार…
■ या योजनेचा लाभ कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
■ मात्र, या योजनेच्या निकषातसंबंधित जमीन असणे आवश्यक आहे.
■ सहकारी संस्था, ग्रामपंचायत देखील योजनेचा लाभ घेऊ शकते.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांना यामुळे २४ तास वीज पुरवठा देखील उपलब्ध होऊ शकतो. यातून पारंपरीक उर्जेचीबचत होणार आहे.