आज दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सरोज दिलीप तिवारी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यालयातील फैजल सय्यद या विद्यार्थ्याने बाबासाहेबांची वेशभूषा करून ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरुघरल्याशिवाय राहणार नाही असा संदेश दिला.”
विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी आम्रपाली सोनवणे हिने बाबासाहेबांची शिकवण शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण सांगितली. इयत्ता नववीतील यश सावळे यांनी बाबासाहेबांचा जीवनपट भीमगीता द्वारे सांगितला. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वैष्णवी अहिरे हिने बाबासाहेबांचा जीवनपट सांगितला. यावेळी विद्यालयातील अश्विनी साळुंखे यांनी बाबासाहेबांची जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी उपशिक्षक सौ ज्योती पाटील सौ निता पाटील श्री संतोष सपकाळे श्री गुरु बारेला श्री कुणाल बडगुजर श्री भूषण पाठक उपस्थित होते.
चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
चैत्यभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे महामानवाला अभिवादन..