पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये पाचोरा तालुका शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेची बैठक तालुका अध्यक्ष
मा. नगरसेवक शांताराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मा. उच्च न्यायालयाने शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणं काढण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत, त्याबाबत चर्चा झाली. शासकीय गायरान जमिनीवर अनुसूचित जाती, जमाती.
आणि गोरगरीब जनतेने उदरनिर्वाहासाठी: शेती करणे कामी असून त्यांना अतिक्रमीत आणि रहिवास कामी अतिक्रमण केले जमिनीवरून हटविण्यात येवू नयेत. पाचोरा शहरात खारवन, बहिरम नगर; म. फुले नगर, सिंधी कॅम्प इत्यादी भागात
शासकीय जमिनीवर रहिवास प्रयोजनार्थ अतिक्रमण केले आहेत. ती अतिक्रमणे त्यांच्या नावे नियमानुकूल करावीत. मा. उच्च न्यायालयाचा आदेशाचा फेरविचार करणेकामी राज्य शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा संस्थेतर्फे करण्यात येईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंदोलन पाचोरा, भडगाव, वडगाव टेक, समझर, पिंपळगाव भडीचे आदि ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजास स्मशानभूमी. साठी स्वतंत्र जागा देण्यात यावी, तसेच अनेक ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीवर झालेली अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत अशी मागणी बैठकीत करण्यात आली, बैठकीत तालुका अध्यक्ष मा.नगरसेवक शांताराम मोरे शहर अध्यक्ष सरखाराम ठाकरे सो, समाजसेवक दयानंद बोरसे, सुभाष मालचे, पिंटू भिल्ल, संभाजी भिल्ल, विकास सोनवणे, आदिनी मार्गदर्शन केले.
बैठकीस रविभाऊ (गुढे) जयवंत बागुल (भडगाव) रविंद्र मालचे (सावदा), रामदास भाऊ (पारोळा) रामा देवाजी (सुसर्डी) अनिल मिल, गुट्टे, भुरा सोनवणे, शिवाजी मोरे, श्रावण मोरे दिनू वाघ (कजगाव) अरुण भिल, (भटगांव) इत्यादी उपस्थित होते.