पीबीसी मातृभूमी वृत्त: दिव्यांग मंत्रालय उद्घाटनाप्रसंगी दिनांक 3 डिसेंबर २०२२ रोजी शिक्षक समन्वय संघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय बच्चू कडू साहेब यांची संजयजी तावडे पाटील यांच्या समवेत के पी पाटील सर प्राध्यापक राहुल कांबळे सर प्रदीप जी सावंत सर आदींनी मुंबई विद्यापीठात दिव्यांग मंत्रालय उद्घाटनाप्रसंगी भेट घेतली.
राज्यातील 63 हजार शिक्षकांना न्याय देण्यासाठी 1160 कोटी रुपये देण्याचे 17 नोव्हेंबर रोजी तत्वतः मान्य केलेले आहे परंतु अर्थ विभागाकडे सर्व प्रस्ताव गेली दोन आठवडे प्रलंबित असल्याचे लक्षात आणून दिले. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून 63 हजार शिक्षकांचा वनवास संपवावा अशी विनंती शिक्षक समन्वय संघा मार्फत करण्यात आली.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव माननीय मनुकुमारजी श्रीवास्तव यांना माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आदेशित केले की प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात यावे.
यावर माननीय मुख्य सचिव मनुकुमार जी यांनी सोमवारी अर्थ विभागाकडून प्रस्ताव बोलवून घेतो असे माननीय मुख्यमंत्री यांना शब्दांकित केले.
शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेण्यात आलेली भेट ही नियोजित होती याची पूर्वकल्पना प्राध्यापक दीपक कुलकर्णी ज्ञानेश चव्हाण नंदकिशोर धानोरकर प्राध्यापक गजानन काकड प्राध्यापक सुशील रंगारी या समन्वयकांनी होती.
आज जवळपास 60 दिवस शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे.
जोपर्यंत अपेक्षित शासन निर्णय शासन दरबारी होणार नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने लढा तसेच पाठपुरावा सुरूच राहणार ,तसेच
कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये .असे आव्हान शिक्षक समन्वय संघ समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.
वारसा हक्काचा प्रश्न सुटणार? प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश