Breaking News
जामनेर: ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्यातील टाकळी(Takali) येथे दोन गटात राडा झाला असून, निवडणुकीतील विजयी गटाने काढलेल्या विजयी मिरावणुकीवर दगडफेक होऊन यात एक जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान मयताच्या नाव धनराज माळी (वय 25) असे असून दोनही गट भाजप प्रणित कार्यकर्त्यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे.