भडगांव:- एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने त्या दिवसी बकरी ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारची कुर्बानी देण्यात येणार नसल्याचा निर्णय काल झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत येथील मुस्लिम बांधवानी घेतला. भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद निम्मित्ताने तहशिल कार्यालयात तहसिलदार यांच्या दालनात शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शांतता कमेटीच्या बैठकीस तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. निर्मल असे तसेच शांतता कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी हजर होते. याप्रसंगी विजय देशपांडे, गणेश परदेशी, जाकिर हाजी कुरेशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनिल पाटील, इम्रान अली सैय्यद, डॉ. निलेश पाटील, पत्रकार शिवदास महाजन यांनी त्यांचे मत मांडले.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. बकरी ईद निमित्ताने मुस्लिम समाजात कुर्बानी प्रथा आहे. शहरातील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देण्यात येवु नये बाबत उपस्थित मुस्लिम बांधवांना सुचविण्यात आले होते. त्यावरुन मिटिंगसाठी उपस्थित हानी जाकिरखान कुरेशी, इस्त्रान अली सैय्यद यांनी आम्ही सायंकाळी मुस्लिम समाजाची मिटिंग घेवुन शहरात जातीय सलोखा आधारित रहावा यासाठी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत समितीच्या बैठकीत जाहीर केला. शहरातील मुस्लिम बांधवांच्या जातीय सलोखा जोपासण्याच्या या निर्णयावरून सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता अबाधित रहावी करिता तहसिलदार भडगांव यांचे पालनात सर्व सदस्यग शांतता कमिटी पदाधिकारी, अधिकारी यांचे भडगांव पोलीस स्टेशनचे गोपनिय अमलदार पोहेकॉ विलास पाटील, पो. कॉ. स्वप्निल चव्हाण यांनी आयोजन केले होते.
महाराष्ट्र शासनाने पत्रकारांचा विमा निर्णयाच्या स्वागतार्थ आमदारांचा सत्कार;पाचोरा पत्रकार कक्षासाठी आ.किशोरआप्पा यांना निवेदन!