गाळण, ता. पाचोरा
गाळण येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत – जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या मैदानात संस्थेचे चेयरमन बाबूलाल राठोड, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे संस्थापक प्राचार्य डी. एफ. पाटील, माजी सरपंच गुमानसिंग राजपूत, शाळेचे प्राचार्य पी.डी. पाटील, डॉ. संजय माळी, आर. पी. बागूल, अशोक महाजन, कैलास अहिरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या नंतर ‘वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाचा ह्रास ‘ या विषयावर प्रबोधन सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेयरमन बाबूलाल राठोड होते.
सभेस पर्यावरणवादी लेते प्राचार्य डी. एफ. पाटील, आनंद नवगिरे, डॉ० संजय माळी यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डी. एफ. पाटील आपल्या भाषणात म्हणाले सर्वात जास्त लोकसंख्या भारतात असून ती एकशे बेचाळीस कोटी झाली आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीन देशालाही मागे टाकले आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज आहे. आनंद नवगिरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रा. रघुनाथ घोडो कर्वे यांनी लोकसंख्ये वाढी बाबत देशाला पूर्वीच इशारा दिला होता व मर्यादित कुटूंबाची, लहान कुटूंबाची कल्पना मांडली होती. त्यांच्या विचारांचा अवलंब झाला असता तर वाढत्या लोकसंख्येला काही प्रमाणात आळा घालू शकलो असतो. यावेळी डॉ. संजय माळी यांचेही समयोचित भाषण झाले.
‘मंचावर प्राचार्य पी.डी. पाटील, मा. सरपंच गुमानसिंग राजपूत, आर.पी. बागूल, अशोक महाजन, कैलास अहिरे, पर्यवेक्षक डी. वाय. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एल. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संयोजक डॉ. महेंद्र खरे यांनी केले तर आभार प्रा. वाल्मिक पाटील यांनी मानले कार्यक्रमास बाराशे विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक, शिक्षीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भडगावात चोरटी वाळू वाहतूक; सहा. पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई; ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त